Summary of the Book
नंदिनी आणि भास्कर या समृद्ध जीवन व्यतीत करणाऱ्या आनंदी दाम्पत्याची ही कथा. एकमेक स्वतंत्र आणि एकमेक एक असे हे दाम्पत्य समुद्रकाठच्या एका सुदूरच्या रम्य ठिकाणी निर्वेध राहायला गेलेले.
नंदिनी सामोऱ्या येऊन गेलेल्या एका अनुभवाचा अभावितपणे उल्लेख करते. भास्कर काहीसा अवाक होतो; तरीही अविचल राहातो. नंदिनीही आहे त्याहून ढळत नाही. खोल आंतरिक समजुतीने एकमेकांना स्वीकारत, शांतरसात एकरूप झालेल्या दोन जीवांचा, समुद्राच्या सान्निध्यात विलक्षणपणे उलगडत जाणाऱ्या त्यांच्या भावबंधाचा उत्कट प्रत्यय इथे येतो.
मिलिंद बोकील यांच्या प्रतिभेचे एक नवे रूप येथे प्रकट होताना दिसते.