Hard Copy Price:
R 90
/ $
1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
रतनचंद शेटजींचे उद्योग उपनिषद्
वालचंद समूहाच्या वतीने, इंडियन ह्यूम पाईप कंपनीचे 1931 पासूनचे यशस्वी कर्णधार श्री. रतनचंद हिराचंद यांनी वयाची साठी ओलांडल्याबद्दल जो सत्कार झाला त्यास उत्तर देतांना श्री. रतनचंद यांनी महाराष्ट्रीयांना व्यापार उद्योगात कर्तृत्त्व खर्ची घालण्याचे आवाहन केले आणि त्याचवेळी उद्योगधंदा यशस्वी रीतीने चालविण्याचे तंत्र, प्रत्यक्ष अनुभव व मनन चिंतन यांच्या योगाने जे त्यांना विदित झाले ते त्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रापुढे ठेवले आहे. एका प्रकारे त्यांचे भाषण हे उद्योगधंदा यशस्वी करण्याचे ‘रतनचंद उपनिषद’च होय असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही.
श्री. रतनचंद यांनी उद्योगधंदा यशस्वी करण्यात आयुष्य वेचले, त्याचबरोबर धनार्जन करतांना अंत:करण केवळ धातूचे बनू न देता सहृदयता व रसिकता त्यांनी टिकवून धरली. उद्योगधंद्यात यश प्राप्त करून देण्याची विद्या जगजाहीर करीत असतानाच त्यांनी मनाची जी अद्यात्मिक बैठक असली पाहिजे असे सांगितले ते अतिशय महत्त्वाचे आहे. अशा अध्यात्मपर बैठकीची जरुरी पं. नेहरु म्हणतात त्याप्रमाणे विज्ञानशास्त्रांतच नव्हे तर रोजच्या उद्योग व्यवहारातही आहे. समाज सत्प्रवृत्त करावयाचा तर श्री. रतनचंद शेठजींनी सांगितल्याप्रमाणे उद्योगधंद्याची अध्यात्माशी सांगड असली पाहिजे.
(दि. 29 सप्टेंबर 1961च्या वृत्तपत्रांतून) येणे प्रमाणे पूर्ण आयुष्य जगलेल्या एका रसिक, कर्तृत्त्ववान महानुभावाच्या वेचक, वेधक आठवणी