Summary of the Book
प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या ग्रामीण कथांचा हा संग्रह. गावातील कारभार, तसंच तिथल्या प्रथा आणि गावातील विविध माणसांचे नमुने सांगणाऱ्या कथा यामध्ये आहेत. सोन्याचा मोह पडून एका पैलवानाकडून खून कसा होतो आणि आयुष्यभर गावाच्या भल्यासाठी झटणाऱ्या या माणसाच्या आयुष्याची वाताहत कशी होते, ते मोह या कथेत दिसते. त्याचबरोबर सासूच्या त्रासावर सुनेनं काढलेला तोडगा वाचताना हसू येतं. चौदा कथाही चांगल्या जमल्या आहेत.