Summary of the Book
भारतीयांएवढे चित्रपटाचे आकर्षण अन्यत्र कोठेही नसेल. मुंबई ही तर कलाकारांची पंढरीच आहे. म्हणूनच हॉलिवूडनंतर बॉलिवूडचे नाव जगात घेतले जाते. निर्मिती क्षेत्रात भारत दुसर्या क्रमांकावर असला तरी चित्रपटविषयक संशोधन आपल्याकडे फारसे झालेले नाही. असा प्रयत्न अशोक उजळंबकर यांनी ‘तुम्हें याद होगा...’मधून केला आहे. भारतात बोलपटाला १९३१पासून सुरवात झाली.
तेव्हापासून २००८पर्यंतचा चित्रपट इतिहास त्यांनी कथन केला आहे. यातील प्रत्येक वर्षात प्रदर्शित झालेले चित्रपट, त्यांतील कलाकार व अन्य माहिती यात दिली आहे. पृथ्वीराज कपूरपासून इमरान खानपर्यंत चित्रपटांचा यात समावेश आहे.