Summary of the Book
जन्म २८ नोव्हेंबर १९३४ पुणे विद्यापीठाची राज्यशास्त्राची पीएच .डी. सुरुवातीच्या काळात कॉलेजमध्ये अध्यापन.नंतर त्याच विद्यापीठात संशोधन प्रकल्पात काम केले. नामांकित मासिकात 'सुधाकर जयवंत'या टोपण नावाने कथा प्रसिद्ध झाल्या.
त्यांना सर्वोत्कृष्ट मराठी कथेमध्ये स्थानही मिळालेले आहे. बालपणी भोगलेल्या गरिबीमुळे ते अध्यात्माकडे वळले. सत्य काय आहे,यासाठी त्यांनी हिमालयात भ्रमंती केली.अनेक साक्षात्कारी साधूंना ते भेटले.त्यांनी जे सांगितले ते त्यांना श्री ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवातून दिसले.त्यांच्या दृष्टीने खऱ्या आध्यात्मिक सिद्धांताची ओळख आणि आत्मसाक्षात्कार करून घ्यावयाचा असेल तर त्यांच्यासाठी हा ग्रंथ म्हणजे संहिताच.