Summary of the Book
भारतात घडलेल्या सत्तांतराला ९० वर्षे लागली. ब्रिटीश राज्यकर्त्यांनी सुचविलेल्या घटनांविषयक सुधारणांचा, त्यांच्या प्रेरणांचा व यशापयशाचा आढावा त्यात आहे. त्या सुधारणांचा योजना व वाटाघाटी, गोलमेजांभोवतीच्या परिषदा व शिष्टाचार त्यांत भाग घेणाऱ्या भारतीय नेत्यांच्या भूमिका आणि व्यक्तिमत्वे यांचा रेखीव आलेख त्यात आहे.
ज्येष्ठ संपादक व लेखक श्री. गोविंद तळवलकर यांनी या अनेकपेडी सत्तांतराचे निवेदन तटस्थ इतिहासकाराच्या वस्तुनिष्ठ दृष्टीने केले आहे. त्यांच्या दीर्घ व्यासंगाचा व माहितीगारीचा भक्कम आधार त्याला आहे.