(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
संवाद म्हणजे माणसाच्या रंगहीन व्यक्तिमत्त्वाला सुगंध देणारी सामाजिक देणगी आहे किंवा दुसर्या शब्दात बोलायचे झाले तर साद नसलेल्या माणसाच्या जीवनाला मिळालेला तो दागिना आहे, नव्हे ती देणगी आहे. ही देणगीही पुन्हा सप्तसुरांची असते. तृप्त करणारी असते. माणसाचं अस्तित्व, माणसाचं व्यक्तित्व, माणसाचं कर्तृत्व आणि माणसाचं वक्तृत्व संवादातून सिद्ध होते. संवादामध्ये समाजाच्या हृदयाला स्पर्श करता येतो. माणसं जोडणं किंवा माणसं ‘तोडणं’ हे केवळ संवादच करू शकतात. मग तो संवाद पुस्तकाच्या माध्यमातून झालेला असो किंवा दुसर्या एखाद्या कलेच्या द्वारे झालेला असो. त्यातही लेखक आणि वाचक हे एकाच पातळीवर येणे रसास्वादाच्या दृष्टिने आवश्यक असते. आपण त्या लेखकाचा ग्रंथ वाचत नसून त्याच्याशी आपण संवाद साधतो आहोत याचा एक अनामिक आनंद वाचकाला त्यातून लाभत असतो. त्यातही एखादा लेखक एकाचवेळी पत्रकार, संपादक, प्रकाशक असेल तर त्या दोहोंच्या संवादात अंतराय निर्माण होण्याची शक्यता असते. या दोघांमध्ये एक अदृश्य स्वरुपाची भिंत निर्माण झालेली असते. जागतिक राजकारणाचा सखोल आणि सर्वांगीण अभ्यास असलेल्या एखाद्या संपादकाने लिहिलेला व्यासंगपूर्ण लेख सर्वसामान्य वाचकांशी संवाद साधेलच असे नाही आणि तो संवाद त्याच्या रक्तामध्ये एकरूप होईल याविषयी देखील शंका वाटते. या पार्श्वभूमीवर श्री. घनश्याम पाटील यांचा ‘दरवळ’ हा ग्रंथ वाचकाच्या डोक्यावरून न जाता अंत:करणात झिरपतो आणि झिरपता झिरपता तो वाचकांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा घटक बनतो हे विशेष म्हणावे लागेल. संवाद हा घटक वाचक आणि लेखक यांना जोडणारा, फुलांनी माखलेला आनंदमार्ग आहे.
पुस्तक परिचय:
'दरवळ' म्हणजे पंचवीस लेख, पंचवीस फुलांनी गुंफलेली माला आणि त्याचा येणारा सुगंध. तो पुण्यातून बेंगळुरू पर्यंत पोहोचला हे नक्की. गेल्या एका आठवड्यात बाहेरगावीच्या कामातूनही मी वेळ काढत झपाट्याने हे पुस्तक वाचून संपवलं. प्रत्येक लेख वाचून झाल्यावर मी अंतर्मुख होत गेलो.
प्रत्येक लेखामध्ये तटस्थपणे, दोन्ही बाजूंनी विचार करत निरीक्षणे व मते नोंदविण्याची लेखकाची हातोटी उत्तम आहे. यामध्ये जगभरातील जाती, नेते, लोक, स्त्री-पुरूष यांच्या किश्शांची रेलचेल आहे. श्रेष्ठ नेत्यांचे चांगले गुण दाखवताना, त्यांचे कानहीं पकडले आहेत. त्यांना बेधडकपणे चपराकसुध्दा लगावली आहे.
थोर राजे, संत महात्मे यांच्या शिकवणीचे भरपूर दाखले दिले आहेत. महापुरुषांचा त्यांच्या अनुयायांनी करत असलेला पराभव वाचून शिकण्यासारखे आहे.
जेष्ठ साहित्यिकांचा सुरुवातीचा खडतर काळ, आताचे दुर्लक्षित साहित्य क्षेत्र, आणि लेखकाने नवलेखकांना दिलेली साथ वाचून कृतज्ञ व्हायला होते.
प्रत्येक लेखाच्या शेवटी वाचकांनी काय करायला हवे, हे लेखकाने उत्तमरीत्या सांगितले आहे.