Summary of the Book
ग्रामीण आणि नागर जीवनाच्या विचार करण्याच्या पद्धतीत मूल्यात्मक फरक आहे. संघर्ष निर्माण झाला की, तो सोडवण्यासाठी शहरी मध्यमवर्गीय माणसे वादविवाद, चर्चा अगर कोर्टकचे-यांचा आधार घेतात. ग्रामीण जीवनाचे असे नाही. नांगराला जुंपलेल्या बैलाने असहकार पुकारला तर प्रथम गोंजारून बघावे, तो ऐकत नसेल तर त्याच्या पाठीवर आसुडाचे घाव घालून सरळ वठणीवर आणावे ही ग्रामीण जीवनातली परंपरासिद्ध अशी स्वाभाविक मनोवृत्ती आहे. खेळीया नाटकातील अनेक घटना रंगभूमीवर घडत नाहीत. घटनांमधील नाट्यापेक्षा घटनेत गुंतलेल्या व्यक्तींच्या मनातले क्रिया प्रतिक्रियांचे नाट्य जास्ती महत्वाचे आहे.