Summary of the Book
पतीचे निधन झाल्यावर विधवा महिलांची स्थिती अनेकदा हलाखीची असते. आज २१ व्या शतकातही असा महिलांना वेगळी वागणूक दिली जाते. शहरात हे प्रमाण कमी असले तरी ग्रामीण भागात वैधव्य आलेल्या महिलांचे आयुष्य दिशाहीन बनते. अशा महिलांचे जगणे सुकर, आनंदी होण्यासाठी डॉ. शारदा निर्मळ -महांडुळे यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत.
तसेच एकटीचं या वळणावर'मधून त्यांना आनंदी जीवनाची दिशा दाखवली आहे. यात एखादा छंद असणे, पती निधनानंतर मुलांसाठी व स्वतःसाठी नैराश्यातून बाहेर येण्यासाठीचे उपाय, वास्तवाचा स्वीकार करून सकारात्मक विचार करणे, आहार, व्यायाम, आरोग्याकडे, लक्ष देणे, एकेरी पालकत्व निभावताना, मुलांचे संगोपन कसे करावे, स्वावलंबनासाठी व्यवसाय, नोकरी करणे, स्वावलंबनासंदर्भात सरकारी योजना, स्त्रीविषयक कायदे, पुनर्विवाह, एकेरी आयुष्य जगताना स्त्री म्हणून सुरक्षेसाठी काय काळजी घ्यावी या बाबत माहीती दिली आहे.
पतीच्या निधनानंतर संघर्षमय जीवनप्रवासाच्या कहाणीत वीरपत्नी कौसाबाई कर्डिले, मीनाताई मुनोत, छायाताई फिरोदिया, मेधाताई काळे, द्वारकाताई डांगे, विद्या शिवरात्री, शांताबाई काळे, तारावी शेठ, लंकाताई पठारे, कुसुमताई चव्हाण, छायाताई मोटे यांचे प्रेरणादायी अनुभव दिले आहेत.