Hard Copy Price:
25% OFF R 599R 449
/ $
5.76
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
‘मूळ पौराणिक कथांच्या पायावर रचलेले हे पुस्तक वाचकाला अंतर्बाह्य थरारून सोडते. अमिश यांची पुस्तके आत्म्याची सखोल गुपिते उघड करतात.’ - दीपक चोप्रा ‘ओघवती, मनाची पकड घेणारी कथनशैली.’ - शशी थरूर ‘तुंबळ युद्धे आणि संघर्ष पाना-पानांवर उसळत आहेत.’ - अनिल धारकर
सैतान आला आहे. देवच त्याला थोपवू शकतो.
शिव आपल्या सैन्याची जुळवाजुळव करत आहे. तो पंचवटी या नागांच्या राजधानीत जातो आणि अखेरीस त्याला सैतानाचा शोध लागतो. ज्या पुरुषाच्या नुसत्या नावानेच बलाढ्य योद्ध्यांनाही कापरे भरते, त्या आपल्या खर्या शत्रूच्या विरोधात पवित्र युद्ध करण्यासाठी नीळकंठ तयारी करतो.
तुंबळ युद्धांच्या मालिकेच्या उद्रेकाने भरतवर्ष हादरून जातो. कित्येक जण मृत्यू पावतात. मात्र कितीही किंमत मोजावी लागली तरीही शिवाला कदापि अपयश येता कामा नये. त्याला ज्यांनी कधीच साहाय्य देऊ केलेले नसते, त्या वायुपुत्रांकडे तो अत्यंत नैराश्यग्रस्त परिस्थितीत जातो.
तो यशस्वी होतो का? आणि सैतानाला प्रतिबंध करण्याची खरी किंमत कोणती असते? भरतवर्षासाठी ती काय असते? आणि शिवाच्या आत्म्याला कोणती किंमत मोजावी लागते?
उत्तम खपाच्या शिवावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील या तिसर्या पुस्तकात या गूढ प्रश्नांची उत्तरे सापडतील.