Summary of the Book
कवी प्रसन्नकुमार पाटील यांचा हा सातवा कवितासंग्रह. वेगवेगळ्या फॉर्ममधल्या कविता हा या संग्रहाचा विशेष. मुक्तछंद, गझल, अभंग असे विविध आकृतिबंध या संग्रहात वाचायला मिळतात. आकृतिबंधाच्या वैविध्यासोबत भाषेची अत्यंत ताकदीची अभिव्यक्ती विशेषत्वाने जाणवते. अगदी प्रेमकवितांपासून सामाजिक विषयांपर्यंत सर्व विषयांवरील कविता यात वाचायला मिळतात. यामध्ये आयुष्याचा शोधही कवी घेतो.
आयुष्य या कवितेत ते म्हणतात, या सार्वभौम शिशिरगळात, स्वतःला न्याहाळताना नुसती वर्षेच उलटून गेल्याचे भान येते. तळहातावरील खरखरीत रेषा खरडताना खूप खूप हरवल्याचीच शोकांतिका होते. हे जागतिकीकरण की सामान्यांचे अगतिकीकरण..? असाही प्रश्न ते विचारतात. मुख्य म्हणजे साहित्याने सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरतील असे प्रश्न विचारण्याची ताकद ठेवायला पाहिजे. ती ताकद प्रसन्नकुमार पाटील यांची कविता दाखवते. त्यांची कविता ही नुसतीच आत्ममग्न नाही, तर भवतालचे भान राखणारीव आहे.