Summary of the Book
पती-पत्नीच्या नात्यातील विसंवादी सूर अधिक गहन बनला, तर ते नाते तुटायला वेळ लागत नाही. असे होऊ नये, यासाठी काही गोष्टी आधीपासूनच समजून घ्यायला हव्यात. डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या या पुस्तकात नेमके हेच सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.
परस्परांच्या सुखासाठी काय करावे याचा कानमंत्र ते देतात. चुकतेय कोण, या प्रश्नाचे उत्तर शोधून वेळीच त्यावर तोडगा काढायला हवा. पती, पत्नी आणि आई या तिघांचे एकमेकांशी असलेले भावनिक नातेसंबंध लक्षात घ्यायला हवेत. रिलॅक्स व्हायला शिका, असे ते सांगतात. आपण जसे आहोत आणि दुसरा जसा आहे, तसाच तो स्वीकारायला शिका, अधिकार गाजविण्याची सवय सोडून द्यायला हवी, असा सल्ला ते देतात. विश्वासाचं नातं आणि लैंगिक जीवनावरही ते चर्चा करतात.