काळेकरडे स्ट्रोक्स
9789386493491 Kadambari Kale Karde Strokes Kalekarde Strokes Novel Pranav Sakhadeo Rohan Prakashan कादंबरी काळे करडे स्ट्रोक्स काळेकरडे स्ट्रोक्स प्रणव सखदेव रोहन प्रकाशन
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 275 R 206 / $ 2.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
उदास पोकळी... की पोकळीतच उदासी राहते भरून ?समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी ? का वागतोय असा ? 'इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस' सारखा कधी झपाटला जातोय... कधी 'पाय सोडून जळत बसलेल्या औदुंबरासारखा' गूकडे गुढाकडे ओढला जातोय.... कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन कवितांमधून व्यक्त होत जातोय.... आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, चैतन्याच्या मैत्रीमुळे कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते. या काळ्या पोकळीत त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात. मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास...अटळ !खाता- पिता- झोपता -उठता -भोगता ही उदासी समीरचा पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जागवतेही ! कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनव्हासवरचे.... समीरच्या अंतरंगातले... असे हे भन्नाट बोल्ड... काळेकरडे स्ट्रोक्स

‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5399761109769068687
Book Review
Write a review

Bookbandhu Reviews
30/06/2025

काळेकरडे स्ट्रोक्स -  प्रणव सखदेव पुस्तक परीक्षण/ Book Review - ओंकार बागल. प्रकाशन - रोहन प्रकाशन पृष्ठ संख्या - २१९ पाने कॉलेज म्हटलं कि आठवतो तो मौजमजेचा काळ. अनेकांना तर त्यांच्या आयुष्यातील अनेक सुखद गोष्टींचा अनुभव याच कालावधीत मिळालेला असतो. मात्र या आनंद देणाऱ्या आठवणींसोबत, अतीव वेदना देणाऱ्या कळासुद्धा याचं वयात पदरात पडतात, हेही तितकंच खरं. काही दशकांपूर्वीच्या तरुणांच्या वाट्याला आलेला त्रास आणि आताच्या तरुणाईला भेडसावणारा त्रास यांत बरीचशी फारकत आहे. दुःखाची छटा सारखीच मात्र काळानुसार तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलला आहे, असं वाटतं. त्यामुळे निश्चितचं या दुखत्या बाजूची व्याप्ती काही अंशांनी भिन्न असल्याचे लक्षात येते; परंतु त्याला कारणीभूत असणाऱ्या बऱ्याच गोष्टी तेव्हाही तशाच होत्या आणि आताही तशाच आहेत. प्रेम, आकर्षण, मोह आणि वासना या सर्व गोष्टींत पुसटशा रेघा आहेत, ज्या आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत. मात्र त्यांत असणारी गुंतागुंतचं इतकी किचकट आहे कि गोंधळून जाऊन एखाद्याचा तोल जाणं ही संभाव्यता नाकारता येणार नाही. अशा मानसिकदृष्ट्या गडबडलेल्या तरुणाईला आणखी दलदलीत ओढणारं इंधन म्हणजे व्यसन. बार, पब, डिस्कोच्या रांगा असलेल्या छोट-मोठ्या शहरांत तर या गोष्टी उपलब्ध असणे म्हणजे अतिशय किरकोळ गोष्ट. ही नशा तरुणांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनून जाते आणि परिणामी बाहेरच्या जगाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किळसवाणा होऊन जातो. त्याशिवाय नकळतपणे घर, पालक आणि तरुण मुलगा अथवा मुलगी यांच्यात कित्येक मैलांचे अंतर निर्माण होऊन बसते. मूळात ही तरुणाई माणसांत मिसळायलाचं घाबरते, लोकांपासून दूर पळू लागते आणि स्वतःच वेगळं विश्व निर्माण करते आणि त्यातच विहार करू लागते. खरं तर त्यांचं हे जग आभासी असल्यासारखंचं असतं ज्याला भक्कम आधार असा नसतोचं कशाचा. कदाचित त्यामुळेचं कि काय, एखादं हलकंसं वारं येऊन गेलं तरी त्यात ही तरुणाई धापकन आदळून पडते. मात्र यामुळे तरुणाच्या मनावर इतका प्रचंड घाव बसतो कि त्यातून सावरायला त्यांना बराच वेळ जातो. सोबत अनंत यातना होतात त्या वेगळ्याच. काळेकरडे स्ट्रोक्स म्हणजे याचं तरुणाईच्या आयुष्यातील नाण्याच्या पलीकडच्या बाजूचे चित्र रेखाटणारी वास्तववादी कादंबरी. काळेकरडे स्ट्रोक्स ही कादंबरी म्हणजे विशीतल्या तरुणांच्या आयुष्यातील एक प्रकारची दुखरी नस. ती जितकी बेधुंद आहे, तितकीच तरुणाईच्या अंतर्मनात घुटमळत राहिलेल्या वेदनांची फुटणारी कोंडी आहे. या कादंबरीतील प्रत्येक पात्र वाचकाला एक वेगळा दृष्टिकोन देतात. या कहाणीची सुरुवात समीर जो या कहाणीचा मुख्य नायक आहे त्याच्यापासून होते. समीर म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातील आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध बंड करून मासकॉमचं शिक्षण घेणारा, फिल्म मेकिंग, रायटिंग या गोष्टींकडे कल असलेला विशीतला तरुण. डोळ्याने अंध असणारा व परिस्थितीमुळे टेलिफोन बूथवर काम करणारा चैतन्य. गर्भगळीत श्रीमंत असलेली मात्र आई वारल्याने आणि बापाने टाकल्याने पोरकी असलेली सानिका. चैतन्य आणि सानिकाचं प्रेमाचं नातं आणि समीरसोबत मैत्री. पदवीचं शिक्षण घेत टेलिफोन बूथ चालवणाऱ्या चैतन्यचा एके रात्री रस्ते अपघाती मृत्यू होतो आणि सानिकावर प्रचंड आभाळ कोसळून येतं. यानंतर या कहाणीत येणारी वळणे वाचताना उत्कंठा अतिशय वाढत जाते. यांच्याशिवाय आणखी काही पात्रे जसं की वरवर पाहता अरुण कामातून गेल्याचं वाटतं असलं तरी अरुणसारख्या पात्राकडे डोळसपणे पाहण्याचा एक वेगळा अनुभव  मिळतो. हेपिटायटीस बी या रोगाने जखडलेल्या सलोनीचे आयुष्य अतिशय साधंसरळ असलं तरी ती तितकीच बिनधास्त आणि जबाबदार अशी मुलगी अनुभवायला मिळते. दादुकाका म्हणजे मुंबईच्या धावगर्दीत समीरला भेटलेला अनोळखी असा आपला माणूस. सुरुवातीपासूनचं संभ्रमित असणाऱ्या समीरच्या आयुष्यात नेमकं काय काय घडणार हा प्रश्न अनुत्तरित ठेवून लेखक प्रणव सखदेव वाचकाला विचार करायला लावतात. ही कहाणी प्रत्येकाची आहे कारण प्रत्येकाच्या वाट्याला असे क्षण येतातचं जेव्हा त्याचे मनं आणि बुद्धी एकमेकांशी भिडत राहतात. म्हटलं तर प्रेमाचा वा मोहाचा त्रिकोण, म्हटलं तर माणसाच्या भावनांचा कल्लोळ अशी ही कादंबरी. वाचताना बऱ्याच ठिकाणी विचार करायला लावणारी ही कथा..काही ठिकाणी वातावरण हलकसं चिंतामय होऊ पाहते; परंतू लेखक चटकन आपल्याला त्यातून बाहेर काढतो. लेखकाने लिखाणात उदासीनता दाखवली आहे हे मान्य. मात्र स्वतःला शेवटपर्यंत टिकवून कसं ठेवायचं हेदेखील सांगितलं आहे. यातलं प्रत्येक पात्र आपल्या आयुष्याला जोडणारं आहे. त्यामुळे वाचक मनाच्या खोल तळाशी जाऊन विचार करायला प्रवृत्त होतो. समीरला शेवटपर्यंत द्विधा मनस्थितीत ठेवून, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार वाचकांवर सोपविण्यात आला आहे. याउलट अरुणचं पात्र जितकं मनमोकळं तितकंच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन, आयुष्यात कार्यमग्न राहणारं पात्र असं म्हणता येईल. आयुष्य हे एकसंध कधीच नसणार आहे, प्रवाहासोबत वाहत राहणं आणि योग्य वेळी त्या लाटेवर आरूढ होणं महत्त्वाचं. सानिका आणि सलोनी या दोन्ही पात्रांत कमालीची भिन्नता आहे. दोघींवर एकंदरीत सारखीच परिस्थिती उद्भवते, सानिका त्यातून पळ काढते तर सलोनी लढणं पसंत करते. या कहाणीत जितकी पोकळी जाणवते, तितकीच खूप सारी प्रेरणा दडलेली आहे, जी वाचकाने स्वीकारायला हवी. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, याची जाणीव वाचकाला होत राहते. प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याची वृत्ती यातून अनुभवायला मिळते. कादंबरीची आणखी एक खासियत म्हणजे या कहाणीची सुरुवात ज्या ठिकाणी झाली आहे, त्याच ठिकाणी म्हणजे कॉलेज गेटपाशीच ती येऊन थांबते. सरतेशेवटी बालकवींच्या औदुंबरमधील काही पंक्तींनी या कादंबरीचा अगदी साजेसा असा समारोप होतो. लेखक प्रणव सखदेव यांनी ज्या भाषेचा, लयीचा आणि शब्दांचा वापर केला आहे, तो विशीतील तरुणाच्या रोजच्या भाषेतील आणि खास मुंबैय्या ठेवणीतील असल्याने मनाशी चटकन एकरूप होतो. समीरच्या भाषेत म्हणायचं झालं तर, एकदम मजबूत लिहिली आहे कादंबरी. शिवाय यातील कथानक हे एकामागून एक घडणाऱ्या घटना असल्या तरी त्यात असणारे वेळेचं अंतर जास्त आहे. मात्र तेही लेखकाने उत्तमरीत्या हाताळले आहे. कथानक मुंबईतील असल्याने वातावरणनिर्मिती अतिशय छान केली आहे. अलीकडेचं मुंबईवर उमटलेले काळे डाग म्हणजे मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला आणि २६ जुलैला ओसंडून वाहिलेली मुंबई. या दोन्ही घटनांसंबंधित असणारे कथानक कादंबरीला घटनास्थळांशी जोडून ठेवतात. कादंबरीतील काळ हा त्यावेळचा आहे जेव्हा इंटरनेट महाग होतं, साध्या मेसेजेस आणि कॉल्सवर लोकांचे संभाषण होत असायचं. तर तरुणाईत विशेष क्रेझ असलेल्या ई-मेल्सद्वारे एकमेकांशी सवांद साधला जात होता, हेसुद्धा कादंबरीत विशेषतः अनुभवायला  मिळेल. दादर-मुळशी-हिमाचल याठिकाणचं वर्णनसुद्धा तितकंच सुंदर लिहिलं आहे. औदुंबर आणि बालकवींच्या कविता हा भाग अतिशय भन्नाट आहे. काळेकरडे स्ट्रोक्स म्हणजे तरुणाईच्या कोवळ्या मनावर, वारंवार ताशेरे मारणाऱ्या रेघोट्याचं आहेत. या कादंबरीत एक प्रकारची उदास पोकळी असली तरी ती भरून काढण्याचे मार्गही आहेत. प्रत्येक तरुणाच्या वाट्याला असे बुचकळ्यात टाकणारे केऑस् येतात, तेव्हा त्याला जास्त हेलकावे न देता, सावरून नेणारी कादंबरी म्हणजे काळेकरडे स्ट्रोक्स. तर अशी प्रचंड वास्तववादाने भरलेली ही कादंबरी म्हणजे तरुणपणातील शुभ्र आठवणींच्या कॅनव्हासवरचे तरुणांच्या अंतरंगात खोलवर जाऊन रुजलेले काळेकरडे स्ट्रोक्सचं. -©ओंकार दिलीप बागल 9321409890/ bookbandhureviews@gmail.com Insta ID - bookbandhu_reviews
Suhaj Shid
14/11/2022

ही कादंबरी इमाजीनेशन साठी छान आहे. पोस्ट मॉर्डन काळात जे घडत ते वास्तव्य मांडलं आहे. अतिशय अफलातून लेखन💙✍️🌍
Dhananjay More
13/01/2022

जबरदस्त आवडली. जणू काही एखादा चित्रपट पाहत आहोत अशीच सारी पात्र आणि चित्र डोळ्यांसमोरून सरकत कादंबरी पुढे सरकत जाते. थोड वाचून बघू म्हटलं पण कुठेच थांबता आल नाही आणि संपूर्ण दिवसात वाचूनच काढली. ऑफिसच कम तसच राहिलं. वर्क फ्रॉम होमचा असा फायदा करून घेतला.
Yogesh Jadhav
22/06/2019

Ekdam Kadak... Nice Story...
shrikant petkar
21/01/2019

"काळेकरडे स्ट्रोक्स " प्रणव सुखदेव या तरुण लेखकाची काल काळ्या येथील महानगर साहित्य संमेलनात भेट झाली . त्याने लिहिलेले काही पुस्तकं विकत घेतली .निळ्या दात दंतकथा कथासंग्रह वगैरे . आज वाचायला घेतलं ते "काळेकरडे स्ट्रोक्स " ही कादंबरी . समीरच्या कॉलेजच्या आयुष्यात येणाऱ्या मैत्रिणीबद्दल आपण वाचत जातो , वाचत जातो . सानिका , चैतन्य आणि समीरच्या मैत्रीत आपण मिसळत जातो. आजकालच्या तरुणाच्या मित्रात अरुणसारखा एखादा मित्रही असतो . एवढंही सत्य पटत राहते . आईवडिलांशी मुलाचं न पटनं , समीरचे घर सोडून जाणं .. प्रणव सखदेवच्या लिखाणात अशी काय जादू आहे कि आपण पान नं पुढचं पान वाचतच राहतो . आजच्या युगातील कॉलेजलाईफ यथार्थ रेखाटलं आहे. सुन्न होऊन जातो जेव्हा समीरच्या मित्राचा , म्हणजे अरुणचा अनुभव वाचला की , समाजात अशा घटना घडत असतात . घराबाहेर वाच्यता होत नसतात . कथाकार , लेखकाचं हेच तर महत्त्व , कर्तृत्व असतं ..समाजाला आरसा दाखवण्याचं ...
Sagar Achalkar
14/11/2018

कादंबरी आवडली. अगदी पहिल्या पानापासूनच कथेने पकड मजबूत केली जी शेवटच्या पानापर्यंत तशीच कायम राहते. म्हणजे पहिल्या पानावरच वाचक लेखकाचे बोट पकडतो आणि मग लेखक जिथे नेईल तिथे मुकाट्याने जात राहतो. मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. समीर, सलोनी, सानिका, अरुण, दादुकाका सगळ्याच पात्रांना depth आहे. अरुणच्या वहिनीचं पात्र थोडक्यात असलं तरी त्या पात्राने कादंबरीला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. त्या पात्राची एक वेगळीच कादंबरी किंवा दीर्घकथा होऊ शकते इतकी depth आहे त्यात. सलोनी आणि समीरच्या फ्रेंडशीपची प्रोसेस इंटरेस्टिंग आहे. कादंबरीत काही अनपेक्षित घटना आहेत ज्या मनाला चटका लावून जातात. ज्याबद्दल इथं बोलणं मी मुद्दाम टाळतोय. कारण इथे त्याचा खुलासा केला तर कादंबरीची मजा येणार नाही. महाविद्यालयीन आयुष्य+वैयक्तिक आयुष्य+प्रेम+सेक्स+ नाती+मैत्री+करिअर+सिगरेट्स+बिअर+कविता+फिल्म्स+पुस्तकं+अजून बरच काही=काळेकरडे स्ट्रोक्स तर कळेकरडे स्ट्रोक्स साठी प्रणव सखदेव यांचे मजबूत आभार!
Prof. Hari Narke
26/10/2018

प्रणव सखदेव हे नव्या पिढीतले महत्वाचे लेखक आहेत. त्यांची "काळे करडे स्ट्रोक्स" ही मजबूत कादंबरी आहे. सखदेव यांची लेखनकळा प्रवाही, चित्रशैलीतली आणि वाचकांशी गप्पा मारणारी आहे. मुंबईच्या रूईया महाविद्यालयात शिकणार्‍या तीन युवक युवतींची उत्तरआधुनिक काळातली चटका लावणारी गोष्ट या कादंबरीतून उलगडत जाते. अरण्या उर्फ अरूण आणि दादूकाका ही भन्नाट अवलियांची जोडी तर काळजातच घुसते. रूईया महाविद्यालयाचा परिसर, दडकर कट्टा, दादर, फाइव्ह गार्डन, मुंबई लोकलचा व्हीडीयो कोच आणि हिमाचल प्रदेश मधलं मॅकलीओडगंज ही नुसती स्थळं न राहता या कादंबरीतली अफलातून पात्रं बनुन आपल्याला भेटतात. सखदेवांनी समकालीन युवकांची घुसमट अतिशय प्रभावीपणे चितारलेली आहे. अवघ्या २१९ पृष्ठांमध्ये सखदेव फार मोठा ऎवज आपल्यापुढे चितारत जातात. कथेतली पात्रं गोलगोल न फिरता सतत विकसित होत जातात. त्यांची मानसिक आंदोलनं आपल्याला जखमी करत जातात. छळतात. तरूण पिढीचा टिपलेला जिवघेणा संघर्ष, औदासिन्य, व्यसनं, सेक्स, हलकल्लोळ,कोलाहल,पोकळी आणि आरपार भिडत जाणारा रक्ताळलेला प्रवास यामुळे ही कादंबरी महत्वाची ठरते.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat