Summary of the Book
आपल्या अवतीभोवती घडणारे प्रसंग, राजकारण, समाजकारण, साहित्य आदी प्रांतातील घटना, गोष्टी याबद्दलची मते, स्वतःबद्दलचा अभिमान, आरशातील खरा चेहरा अशा सर्व बाबींवर ग. वा. बेहरे यांनी 'कटाक्ष 'मधुन लिहिले आहे.
माणसांचे अचानक भेटणे, निघून जाणे, माणसांची सोबत, लेखकाची आत्मप्रौढी, थोड्याश्या कौतुकाने हुरळून जाणारे साहित्यिक, आपल्या मातीतील माणसांकडे होणारे दुर्लक्ष, कलावंतांची मैत्री, अहंकार यावर यात मतप्रदर्शन आहे. समाजात वावरत असताना एकांतातील सुखानुभवाचे वर्णन आहे.
जात, रंगभेद, विसरून समाजात वावरणारी उत्तुंग माणसे, निसर्गाचे वरदान, त्यातून मिळणाऱ्या शिकवणुकीची जाण त्यांनी जाणली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्याची स्वप्ने, त्या स्वप्नपूर्तीचे समाधान, नेहरू युगाने जनसामान्यात उभारलेले स्वप्नांचे इमले, त्याच स्वप्नांना शब्दांचे आवरण देऊन इंदिरा गांधी यांची राजकारण करण्याची पद्धत.
गांधीजी, नेहरू, सावरकर यांच्या विषयी निर्भीड, स्पष्ट मते यात मांडली आहेत. अनेकांच्या मनात येणारे विचार यात कागदावर उमटले आहेत.