Hard Copy Price:
10% OFF R 250R 225
/ $
3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
‘भावयात्रा’ हा गुजरातचे मुख्यमंत्री व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांचा कवितासंग्रह आहे. ‘आँख आ धन्य छे’ हा त्यांचा मूळ गुजराती भाषेतील काव्यसंग्रह! या काव्यसंग्रहाची ‘भावयात्रा’ ही मराठी आवृत्ती आहे. निसर्गचित्रं, मानवी भावभावना, भोवतालच्या घडामोडी या विषयींचं नरेंद्र मोदी यांचं हे काव्यमय चिंतन आहे.
यातील एका कवितेत नरेंद्र मोदी यांनी समर्पकपणे म्हटलं आहे. ‘तुम्ही मला छायाचित्रात वा पोस्टरमध्ये शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका, मी तर मांडी घालून बसलोय माझ्या आत्मविश्वासात, माझ्या वाणीत, वर्तनात अन् कर्मात. तुम्ही मला माझ्या कार्यानेच ओळखा कार्य हेच माझं जीवन-काव्य.’ आपल्या काव्यातून नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्याबद्दल निसर्गाच्या अद्भुत रूपाबद्दल कृतार्थता व्यक्त केली आहे. त्यांची भावयात्रा गुजरातची जीवनदायिनी असलेल्या नर्मदेपासून थेट हिमालयापर्यंत चालते. हे जीवन समजून घेण्याची, त्याचा मनापासून आस्वाद घेत, त्याविषयी कृतार्थता बाळगण्याची तरल भाववृत्ती त्यांच्या काव्यात दिसून येते.
नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर एक दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात येतं- आव्हानं, धाडस, विरोध यांतून सतत तावून सुलाखून निघालेलं हे व्यक्तिमत्त्व आहे. आपलं आयुष्य समाजासाठी, सामान्य जनतेसाठी... समाजातल्या शेवटच्या घटकाच्या प्रगतीसाठी आहे. विकासाच्या मार्गावर प्रगतीच्या दिशेने पावलं टाकत असताना आपल्या देशावरची निष्ठा अधिकाधिक दृढ व्हायला हवी, हा नरेंद्र मोदी यांचा संस्कार आहे. या काव्यसंग्रहातील अनेक कवितांमधून नरेंद्र मोदी यांचे देशाभिमानी नेतृत्व दिसून येते. त्यांच्या कवितांतही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातली संवेदनशीलता आणि कणखर वृत्ती दिसून येते. निसर्गाच्या सुंदर रूपाबरोबरच सभोवतालच्या समाजातल्या गोष्टी ते परिणामकारकरित्या वाचकांपर्यंत पोहोचवतात. भारतात संस्कृती व तत्त्वज्ञानावर गाढ श्रद्धा असणार्या नरेंद्र मोदी यांनी कवितेतून मांडलेली ही जीवनविषयक विचारसूत्रे आहेत.महत्त्वाच्या कामांच्या नोंदी येथे करण्यात आल्या आहेत.