Summary of the Book
सामूहिक, एकत्रित शहाणपणानं एकत्र येऊन नागरिकांनी बदल घडविण्याची तुरळक का होईना, पण ठसठशीत उदाहरणं आपल्याकडे आहेत, आणि माणूस आणि निसर्ग यांच्या ओढाताणीत निसर्गाचा जर विजय होणार असेल, तर तो याच शहाणपणामुळं होईल. प्रश्न आहे, तो हे ताणतणाव; बदल घडवू शकणा-या सजग वाचक - नागरिकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवण्याचा. "अरण्यरुदन" हा त्यासाठीचा एक छापील भक्कम प्रयत्न.