Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
श्रीमद्भगवद्गीता हा भारतीयांचा महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो . तिच्या वाचनातून अंतिम सत्याचे दर्शन घडण्यास मदत होते. व्यवहार व परमार्थ एकत्र साधला जातो . यामुळे आध्यात्मिक गोंधळ बाजुला सारता येतो आदी मुद्दे स्पष्ट करीत त्यांचे विवेचन व गीतेचे हे वेगळेपण व डॉ. वृषाली पटवर्धन यांनी 'नाथगीता'मधून दाखवुन दिले आहे . जीवाला त्याचे अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी गीता मदत करू शकते , असे यात म्हटले आहे . पंचेद्रिये ( पांडव ) , शेकडो आसक्ती ( कौरव ) , अनियंत्रित विचार ( दोन्ही बाजूचे सैन्य ) , संभ्रमित मन (अर्जुन) व आत्मज्ञान, अशी रचना देहाची असते. त्यांच्या सततच्या महायुध्दातून विवेकाने विजय मिळवीत परमप्रकाशात विलीन होण्याची क्रिया म्हणजे गीता, या अर्थाने या पुस्तकात महाभारताची प्रतीकात्मक कथा असून, हे रूपक उलगडून दाखविले आहे. दशानन, मोक्ष, संन्यास, यज्ञ यांसारख्या अनेक संकल्पना लेखिकेने समजावून सांगितल्या आहेत. चुकीच्या पारंपारिक मतांचे खंडन करीत योग्य विचार करण्याची दिशा यातून दाखविली आहे.