Hard Copy Price:
25% OFF R 370R 277
/ $
3.55
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
भारतीय समाजात अनुदार प्रवृतींचे प्रस्थ १९७० आणि नंतरच्या दशकांत वाढत गेले . मार्क्सवादी -लेनिनवाद्यांना भारतीय राज्यघटना कधीच पचनी पडली नाही ;कारण तिने कोणा एका पक्षाचा (म्हणजे त्यांच्या पक्षाचा !) विशेषाधिकार मान्य केला नाही. तशीच ती हिंदू कट्टरवाद्यांनाही पचली नाही ;कारण तिने कोणा विशिष्ट धर्माला (म्हणजे त्यांच्या धर्माला !) विशेषाधिकार दिले नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच , धार्मिक अतिरेक्यांनी आणि डाव्या क्रांतिकारकांनी बळाचा वापर करून त्यांच्या पोथानिष्ठा लादण्याचे वारंवार प्रयत्न केले. अलीकडच्या दशकांत लोकशाही कार्यपद्धतीला तिसरा धोका समोर येऊ लागला आहे. हा आहे भ्रष्टाचाराचा आणि व्यक्ती , घराणी आणि जातगटांच्या मार्फत सार्वजनिक संस्था आणि राजकीय पक्ष यांच्यावर ताबा मिळवत , घटनात्मक केंद्र पोखरून दुर्बल होण्याचा ... जिद्द हरवल्यामुळे वा संधिसाधूपणामुळे काही लेखक व बुद्धिजीवींनी कॉंग्रेसची खुशमस्करी सुरु केली . या लाचारीचा उव्देग आल्याने इतर काहींनी भारतीय जनता पक्षाची कास धरली , पर्यायाने हिंदू धर्माधिष्ठीत राष्ट्राच्या उद्धिष्टावर आपली मोहोर उठविली . बुद्धिजीवींचा तिसरा गट अपराधी भावनेपोटी वा निव्वळ मूर्खपणातून , मध्य भारतातील जंगल व डोंगराळ प्रदेशांत आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्नात असलेल्या क्रांतिकारी माओवाद्यांचा समर्थक बनला ... वास्तव्य दिल्लीत नाही , तर बंगलोरमध्ये असल्यामुळे असेल कदाचित , मी राजकीय पक्षांपासून माझे स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकलो. कॉंग्रेस, संघ परिवार आणि संसदीय डावे यांच्याविषयीच्या माझ्या मतभेदाच्या मुद्द्यांची चर्चा या पुस्तकातील निवडक निबंधांत केली आहे .... मी माओवाद्यांचाही टीकाकार आहे ; कारण सभ्यता आणि लोकशाही यांना कॉंग्रेसी भ्रष्टाचार आणि संघ परिवाराची असहिष्णुता यांपासून जेवढा धोका आहे , तेवढाच माओवाद्यांपासूनही आहे , असे मी मानतो.