Summary of the Book
भारतीय समाजात अनुदार प्रवृतींचे प्रस्थ १९७० आणि नंतरच्या दशकांत वाढत गेले . मार्क्सवादी -लेनिनवाद्यांना भारतीय राज्यघटना कधीच पचनी पडली नाही ;कारण तिने कोणा एका पक्षाचा (म्हणजे त्यांच्या पक्षाचा !) विशेषाधिकार मान्य केला नाही. तशीच ती हिंदू कट्टरवाद्यांनाही पचली नाही ;कारण तिने कोणा विशिष्ट धर्माला (म्हणजे त्यांच्या धर्माला !) विशेषाधिकार दिले नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच , धार्मिक अतिरेक्यांनी आणि डाव्या क्रांतिकारकांनी बळाचा वापर करून त्यांच्या पोथानिष्ठा लादण्याचे वारंवार प्रयत्न केले. अलीकडच्या दशकांत लोकशाही कार्यपद्धतीला तिसरा धोका समोर येऊ लागला आहे. हा आहे भ्रष्टाचाराचा आणि व्यक्ती , घराणी आणि जातगटांच्या मार्फत सार्वजनिक संस्था आणि राजकीय पक्ष यांच्यावर ताबा मिळवत , घटनात्मक केंद्र पोखरून दुर्बल होण्याचा ...
जिद्द हरवल्यामुळे वा संधिसाधूपणामुळे काही लेखक व बुद्धिजीवींनी कॉंग्रेसची खुशमस्करी सुरु केली . या लाचारीचा उव्देग आल्याने इतर काहींनी भारतीय जनता पक्षाची कास धरली , पर्यायाने हिंदू धर्माधिष्ठीत राष्ट्राच्या उद्धिष्टावर आपली मोहोर उठविली . बुद्धिजीवींचा तिसरा गट अपराधी भावनेपोटी वा निव्वळ मूर्खपणातून , मध्य भारतातील जंगल व डोंगराळ प्रदेशांत आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्नात असलेल्या क्रांतिकारी माओवाद्यांचा समर्थक बनला ...
वास्तव्य दिल्लीत नाही , तर बंगलोरमध्ये असल्यामुळे असेल कदाचित , मी राजकीय पक्षांपासून माझे स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकलो. कॉंग्रेस, संघ परिवार आणि संसदीय डावे यांच्याविषयीच्या माझ्या मतभेदाच्या मुद्द्यांची चर्चा या पुस्तकातील निवडक निबंधांत केली आहे .... मी माओवाद्यांचाही टीकाकार आहे ; कारण सभ्यता आणि लोकशाही यांना कॉंग्रेसी भ्रष्टाचार आणि संघ परिवाराची असहिष्णुता यांपासून जेवढा धोका आहे , तेवढाच माओवाद्यांपासूनही आहे , असे मी मानतो.