Summary of the Book
आपण कोण,कोठून आलो, कोठे जाणार, या जगाचा कोणी निर्माण करणारा आहे का, त्याचे स्वरूप काय, तो कोठे राहतो, काय करतो , त्याचा आपला काही संबंध आहे त्याची आपली भेट होऊ शकते का, त्या भेटीसाठी कोणता मार्ग आहे, ही भेट झाल्यावर लाभ काय, ही देवाची भेट न झाली तर चालेल का वगेरे शेकडो प्रश्न परमार्थ क्षेत्रातील व्यक्तींना पडतात.
ज्ञानोबारायांची दृढ सेवा करून त्यांचा साक्षात्कार प्राप्त करून घेतलेले अलौकिक पुरुष श्रीजोगमहाराजांनी या पुस्तकात तत्वज्ञान विषयक विचार संवाद रुपाने सांगितला आहे . शिष्याने प्रश्न विचारले व गुरुजींनी त्याचे उत्तर दिले अशी त्याची मांडणी आहे