Summary of the Book
दलित कवितेतील हिंदुत्त्व या ग्रंथापासून सुरु झालेला लेखकाचा समीक्षेचा प्रवास विकसीत होत तो समीक्षेच्या केंद्रस्थानी बुद्ध विचार घेऊन स्थिरावला आहे. मानवी जीवन हे दु:खकारक आहे. हे दु:ख कसे संपुष्टात आणायचे यासाठी बुद्धाने चिंतन केले आणि ते सुखकारक होण्यासाठी 'दु:खनिरोध' ही संकल्पना मांडली. या संकल्पनेला लेखनाला साहित्याच्या प्रयोजनाशी जोडले आहे. कला ही जीवनातून येते याचा अर्थच मुळी कलेचा पायाच माणूस आहे. बुद्धाच्या धम्माचाही पाया माणूस आहे. त्याने नीतीमान माणसाचे स्वप्न पहिले. या नीतीविचाराने जगभरातल्या विचारवंतांना भुरळ घातली आहे. मानवी जीवनात नीतीला अनन्य असे स्थान आहे. ही नीती माणसाचे माणूसपण जपणारी आहे. माणसावर माणूस म्हणून प्रेम करणारी आहे.
आज जगभर माणसाकडून माणसाला उध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर कलावंताने आपल्या कलेद्वारे माणूस जागवण्याचा, जागवण्याचा, त्याच्या दु:खनिरोधाचा आविष्कार करायला हवा हा आग्रह या ग्रंथातून प्रत्ययाला येतो.