Summary of the Book
भारताच्या फाळणीनंतर काश्मीरचा लढा पाकिस्ताननी सुरू केला.
धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली. काश्मीर मिळण्यासाठी
पाकिस्तान शासकांनी काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया सुरू केल्या.
अतिरेक्यांकरिता प्रशिक्षण केंद्रे उभारली आणि त्यांना मोठ्ठ्या प्रमाणात
आर्थिक साहाय्य दिलं.
हे सारं होत असताना आपला देश भिकारी बनला आहे, कंगाल बनला
आहे, आपली आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे; ह्याची थोडीदेखील
तमा त्यांनी बाळगली नाही. हिंदुस्तानची प्रगती सहन न होणारी होती.
त्यातून द्वेष, प्रचंड राग, तिरस्कार आणि सूडाची भावना जोपासली गेली.
ह्यातून भारताला संपविण्याची मानसिकता कशी निर्माण झाली, हे
समजून घेण्यासाठी सदर पुस्तक वाचायलाच हवे.