Summary of the Book
साधारणपणे एक दशकहून अधिक काळ पाणी या विषयाच्या संदर्भात डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी केलेले मूलगामी चिंतन ' शुष्क नद्यांचे आक्रोश ' या ग्रंथातून व्यक्त झाले आहे. ३५० पृष्ठांच्या या पुस्तकात शेवटी ते म्हणतात ,
' मी शास्त्रज्ञ , अभियंता , अर्थतज्ज्ञ यापैकी कोणीही नाही , मी एक सामान्य भारतीय आहे. जलावर , नद्यांवर भरभरून प्रेम करणारा. त्यांच्यातील चैतन्याची अनुभूती घेताना मला जे जाणवले ते मी प्रामाणिकपणे लिहिले आहे. प्रत्येक नदीचा जो आक्रोश मला उलगडला तो तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. '
आणि त्यांनी उलगडलेला हा आक्रोश खरोखर सुन्न करणारा आहे.