Summary of the Book
मधुकर तराळे यांची 'जाणीव' स्थानिक संदर्भातील खरीच , पण विश्वास्मकतेला आवाहन करणारी आहे . जग भटकूनही , ' शेतकरी ' ही आपली ओळख आहे , असे व्यवच्छेदक भान असलेली ही कविता आहे . म्हणून साक्षात विठ्ठलालाही जब विचारण्याचे चारित्र्य या कवितेत येते . अविवेकी असहिष्णुता आणि संवेदनशून्यतेने वर्तमानाला विळखा घातलेला असताना , सामान्य माणसाचा हा आतला आवाज मला आश्वस्त करतो आहे .
संतसाहित्यापासून ते लावणीपर्यंत साऱ्या अभिव्यक्तींची ओढ असणारा हा कवी रोज नव्याने व्यक्त होताना , त्याची नवता अक्षय राखतो . ' मातीचा घसा सुकतो ' ही संवेदनशीलता ज्या कवीच्या ठायी असते , तोच असा नित्य नवा असू शकतो . मधुकर तराळे यांच्या लिहिण्याच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणा विश्वभान देणाऱ्या आहेत. माणूसपणाची गोष्ट सांगणारा हा कलासक्त लेखक आहे . प्रेयासीतही बुद्ध पाहणारा आणि समाजातल्या विषमतेने अस्वस्थ होणारा असा हा कवी आहे . ज्याचे स्वभान विस्तारते , तेव्हाच अशी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना खोल असू शकते . मधुकर तराळे यांच्या मधुघंटातील हा आशय वाचकांपर्यंत पोहोचेल , अशी खात्री आहे.