Summary of the Book
समर्थ रामदासांनी नुसती ईश्वर भक्तीच शिकविली नाही तर त्याचबरोबर बलोपासना आणि व्यवहारही शिकविला. त्यांनी लिहिलेला ''दासबोध'' हा 'मराठीतील वेद' म्हणूनच ओळखला जातो. या ग्रंथात त्यांनी जगात कसे वागावे ? उत्तम पुरुषाची लक्षणे, मूर्ख लक्षणे कोणती? ती कशी टाळावीत, हस्ताक्षर कसे असावे? उत्तम गायन-कीर्तन कसे करावे? राजकारण किंवा समाजकारण करणार्यांनी कसे वागावे अशा अनेकविध विषयांवर सदुपदेश केलेला आहे. संपूर्ण दासबोधाचे सारच या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या हातात दिले आहे.