Dr.Madan Jadhav
15/01/2023
रिपोर्टाज पद्धतीने लिहिले गेलेलं हे पुस्तक म्हणजे अनिल अवचट यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक भान यांचं सुरेख मिलाप आहे. समाजातील उपेक्षित घटक ज्यात दलित आणि मागास प्रवर्गातील पिढ्यानपिढ्या रंजलेगांजलेले लोक येतात, त्यांच्यावर उच्चवर्णीय समाज ठरवून अत्याचार कसा करतो आणि अशा अत्याचारांना सहकार्य करायला व कायद्याच्या कचाट्यातून सहिसलामत सोडवायला पोलीस आणि शासनामधील उच्चवर्णीय कसे मदत करतात, याच्या याची देही याची डोळा पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या सत्यकथा म्हणजे हे पुस्तक.
शहरांमध्ये आणि बंगल्यात राहणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना जगाच्या दुसऱ्या बाजूचे दर्शन घडविणारे पुस्तक...