Hard Copy Price:
15% OFF R 100R 85
/ $
1.09
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
काही वेळेला शहरात फेरीवाले आपल्या गाड्या ढकलीत ग्राहकांना हाक मारीत असतात-"कोई भी चीज उठाव, डॉ रुपयोमे !" प्रा. मिलिंद जोशी यांचा 'लय भारी' हा नवा कथासंग्रह वाचत असताना मला या हाकांची आठवण झाली. या संग्रहातील कथाच मुळात अशा आहेत की, त्या वाचताना तुम्हाला 'गंमत' वाटल्याशिवाय राहणार नाही. या कथासंग्रहातील पात्रेच तशी हास्य फुलवणारी आणि मन वेधून घेणारी आहेत. 'गुरुदक्षिणा'मधील तुंदीलतनू आनंदीबाई, 'ग्रंथतुला' कथेतील ग्रंथवेडे नाना मराठे काय , म्हणजे 'बदली' कथेतील मोहन रणदिवे काय , हि मंडळी रसिक वाचकांना गंभीर ठेवूच शकतच नाहीत. इतर कथेतील पात्रेही वाचकांना विसरता येणार नाहीत अशी आहेत. प्रा. मिलिंद जोशी यांच्या काही कथा 'लोककथा' या स्वरूपातील आहेत. 'रावनपिठले' ही कथा या प्रकारची वाटते. तीही वाचकांना हसवल्याशिवाय राहणार नाही. प्रा. मिलिंद जोशी यांच्या इतर कथा उपहास, उपरोध यांचा उपयोग करून हास्य निर्माण करतात. या सर्व दृष्टीने प्रा. मिलिंद जोशी यांनी एक नवीन रंजक; पण वाचकांना अंतर्मुख करणारे लेखन दिले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.