Summary of the Book
रवींद्र जोशी यांनी लिहिलेल्या या पुस्तकात दहा बहारदार व्यक्तिचित्रे आहेत. म्हादबा भावसार या साध्याभोळ्या माणसापासून ते अगदी मधुकर चिरोलीकर या संस्थानिकाच्या मुलापर्यंतची वेगवेगळया प्रकारची माणसे या पुस्तकात भेटतात.
अत्यंत नेमक्या शब्दात त्या व्यक्ती उभ्या करण्याची लेखकांची शैली आणि या व्यक्तींचा स्वभाव सांगणारे निवडून काढलेले प्रसंग यामुळे या व्यक्ती खरचं आपल्यालाही भेटायला हव्यात असे वाचकाला वाटते तेच लेखकाचे यश आहे. यातील मनवलीकर मास्तराची कथा चटका लावून जाते.
पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीतील काही मंडळी आठवावीत इतकी ही बहारदार व्यक्तिचित्रे आणि लेखकांची प्रवाही शैली आहे.