Summary of the Book
काही कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात इतिहास घडविला आहे. गो. नी. दांडेकर यांची पडघवली ही त्यातीलच एक. गो. नी. सांगतात, 'पडघवली ही कादंबरी नव्हे; ते एका नष्ट होऊ घातलेल्या खेड्याचे शब्दाचित्र आहे.' 'पडघवली सर्व मरगळ आलेल्या खेड्यांची प्रातिनिधी आहे.' त्यांनी भारतभर भ्रमंती केली होती. त्यामुळे त्यांनी खेडी, तेथील जीवन जवळून पाहिलं होतं. त्यातून प्राचीन समाजव्यवस्था ढासळली आसल्याचं लक्षात आलं. याच पडझडीचं दर्शन त्यांच्या या कादंबरीतून होतं. ते सगळं पाहताना त्यांचं संवेदनशील मन दुःखी होतं. या सगळ्याचं दर्शन घडवताना त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. जुन्याच्या जागी नवं काय निर्माण होईल, याचा घेतलेला शोधही प्रत्ययास येतो.