Summary of the Book
भारतासारख्या खंडप्राय देशात मध्यवर्ती शासनाकडून म्हणजे केंद्र सरकारकडून संपूर्ण देशाची व्यवस्था पाहिली जाते, पण त्याचबरोबर सत्तेचे विकेंद्रीकरण करून गाव, शहर पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन देण्यात आले. यालाच पंचायत राज म्हणतात. महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न सोडविले जातात. या संस्थांचे कार्य नक्की काय असते, कसे चालते, मुलकी व पोलीस प्रशासन, ग्रामीण विकास योजना, महाराष्ट्रातील पंचायत राज, त्याचा इतिहास, घटनादुरुस्ती आदींबाबतची माहिती मनोज आवळे यांनी पंचायत राज मधून करून दिली आहे. सोप्या भाषेत ती माहिती राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, शासन सेवेतील पदाधिकारी, लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी व अन्य नागरिकांसाठी उपयुक्त आहे.