Summary of the Book
मार्च १९९३ -बाँबस्फोटांच्या मालीकेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे .या दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार दाउद इब्राहीम कोणाच्याही नकळत सीबीआयला अनेक फोन कॉल्स करतो .त्याला स्वतःचं 'निरपराधित्व 'सिद्ध करण्याची घाई झाली आहे .
जानेवारी २००२ - जिहादी गटांना सामील असलेला आणि दुबईत राहणारा एक कुख्यात गुंड आफताब अन्सारी हा खोट्या पासपोर्टच्या आधारे पाकिस्तानात पळून जाण्याच्या बेतात आहे ,पण ऐनवेळी त्याला अटक होते .
या आणि अशा अनेक सुप्रसिद्ध घटनांमागे एका अत्यंत बुद्धिमान आयपीएस अधिकाऱ्याचं काम होतं. आपल्या ३७ वर्षांच्या कार्यकालात या अधिकाऱ्यानं अनेक अतिरेकी संघटनांचं कंबरडं मोडलं आहे ,जगभरातल्या संघटीत गुन्हेगारी टोळ्यांना बेचिराख केलं आहे .यासाठी त्यांनी इंटरपोल ,एफबीआय ,न्यू स्कॉटलंड यार्ड आणि अशाच इतर संघटनांसोबत काम केलं आहे .असे धारदार तपासकार्य करणारे अधिकारी म्हणजे,श्री .नीरज कुमार .