Summary of the Book
कवितेच्या पोटातून शब्दशक्तीचा खदखदता लाव्हारस क्रांती आणि समतेची ज्योत पेटवित असते. कविता ही कविला मिळालेली अमूल्य देणगी आहे. कवितेने मुक्त होतात दुःखाचे उमाळे अन कवितेनेच फुलतात सुखाचे मळे. कविता माणसाला जगण्याचे सामर्थ्य देते. कविता विश्वाचा ठाव घेते. कविता कधी पृथ्वी तर कधी आकाशाला गवसणी घालते. तर तीच कविता वादळात ब्रह्मांडालाही तोलते. अशीच आपल्या लेखणीची जादू चालवणारी कवयित्री राजश्री पाटील अनेक सुख-दुःखांना वादळांना कवितेतून गवसणी घालत आली आहे.