Hard Copy Price:
25% OFF R 120R 90
/ $
1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 120R
90
/
$
2.00
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
मराठीची आजची अवस्था आत्मचिंतन करावयास लावणारी. ....
Sarang Khaty
04 Dec 2019 05 30 AM
साधारणतः सातशे वर्षांपूर्वी माऊलींनी मराठी भाषेचे वर्णन 'अमृतातेही पैजा जिंके' असे केले होते, काळाच्या ओघात माय मराठीकडे दुर्लक्ष होत गेले किंवा कवीने म्हटल्याप्रमाणे 'माय तत्त्वापासून, माया तत्व' दूर घेऊन आले. भाषेचे मूळ स्वरूप न ओळखण्याइतपत बदलले, हे आपण नाकारू शकत नाही, याला कोण किती प्रमाणात जबाबदार आहे, हा वादाचा विषय असला तरी, 'अर्थव्यवहारातील जागतिकीकरण' घराघरात रुजले हे खरे, ही आपल्या पिढीने अनुभवलेली अतिशय मोठी घटना आहे, तिचा सिंहाचा वाटा भाषेचा पोत बदलण्यात किंवा सैल होण्यात झाला.
'पानिपत' निमित्ताने महाराष्ट्राच्या बाहेर पडलेले मराठी लोक, पर मुलुखात स्थिरावले, आज नोकरीच्या; व्यवसायाच्या निमित्ताने ते गुडगाव, नोएडा, बंगळुरू येथपासून ते जगाच्या पाठीवर जवळजवळ सगळ्याच खंडात पोटापाण्यासाठी स्थलांतरित झाले. जागतिकीकरणाच्या या धामधुमीत मागील तीस वर्षात नवीन मराठी पिढी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या बाहेर पडली आणि नंतरची पिढी एवढी दुरावली की, दुर्वांनाही- 'ग्रास' म्हणू लागली.
जीवनचा हा कवितासंग्रह या सर्व घटितांची उजळणी घडवतो.