Summary of the Book
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उदयाला आलेली विद्रोही कविता दारिद्र्य, अन्याय, शोषण, अपमान यामुळे घायाळ झालेल्या दारुण जीवनातून जन्माला आलेली आहे. ती संतप्त नसेल तरच नवल. अमानुष रुढींविरुद्ध लढण्यासाठी तिने चार्वाक, बुद्ध, फुले, आंबेडकरांप्रमाणे मार्क्स, लेनिन आणि निग्रो कवींपासूनही काही आशय घेतला आहे. तिचे सांगणे एवढेच आहे की या भूमीत पशूप्रमाणे जीवन कंठणा-या माणसाला, माणूस म्हणून सन्मानाने जगता आलेच पाहिजे.