Summary of the Book
कोणतेही पीठ किंवा मठ स्थापन न करता जगद्गुरू ही पदवी मिळालेले संत तुकाराम हे वारकरी सांप्रदायाच्या जडणघडणीत तुकोबांचे स्थान कळसाचे आहे. त्यांच्या पश्चात लगेच झालेले संत निळोबा यांनी वारकरी परंपरेचे निरुपण करताना जगद्गुरूत्वाचा मान संत तुकारामांना दिला आहे. तुकारामांची गाथा महाराष्ट्रात 'पाचवा वेद' म्हणून मान्यता पावली आहे. तुकोबांचे अभंग लोकांच्या मनीमानसी रुजले आहेत. अलीकडे काही अभ्यासक तुकोबांना मराठी वाङमयाच्या केंद्रस्थानी मानतात. तुकोबा मराठी वाङमयातील एक असे शिखर आहे की, या शिखराचे 'भक्तिमार्गप्रदीप' कार ल.रा. पांगारकर किंवा आधुनिक कवी दिलीप चित्रे यांना सारखेच आकर्षण आहे.