Summary of the Book
तुकाराम महाराज यांच्याबद्दल वारकरी संप्रदाय आणि एकूणच मराठीजणांमध्ये नितांत आदर आहे. त्यांच्या अभंगवाणीतून सामान्यांना जीवनाचे सार समजते. संत साहित्यातून तुकाराम महाराजांचे जे चरित्र रंगविले आहे, ते त्यांच्या प्रत्यक्ष व्यक्तिमत्वाशी विसंगत आहे. असहाय्य भोळसट, व्यवहारशून्य, सदैव टाळ कुटीत असलेले त्यांचे चित्र नाही. उद्दाम, अहंकारी धर्मसत्तेला आव्हान देणारे लढवय्ये संत, असे त्यांचे खरे व्यक्तिमत्व आहे. वयाच्या विशीत त्यांना सामाजिक न्यायाचा साक्षात्कार झाला. त्यातून लोकांची कर्जखते त्यांनी इंद्रायणीच्या डोहात बुडविली. शुद्ध भावना, शुद्ध आचरण, रंजल्या-गांजलेल्यांना मदत करणे, हीच ईश्वरभक्ती आहे, असे त्यांनी सांगितले. समाजव्यवस्थेला न्यायचे अधिष्ठान देऊन त्यांनी समाजव्यवस्थेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध लढा उभारला. संत तुकाराम महाराजांविषयी वेगळा व वास्तवतेला धरून असलेला दृष्टिकोन आ. ह. साळुंखे यांनी 'विद्रोही तुकाराम'मधून मांडला आहे. त्यातून तुकाराम महाराजांचे खरे व्यक्तिमत्व कळते.