Summary of the Book
राजकारणात असूनही ज्यांनी साहित्य, कला या क्षेत्रात रसिकतेने संचार केला आणि लेखनही केले असे व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख. गडाख यांनी यापूर्वी दोन पुस्तके लिहिली आहेत. हे त्यांचे तिसरे पुस्तक. यामध्ये त्यांनी काही व्यक्तिचित्रे आणि अन्य लेख लिहिले आहेत. साधीसोपी भाषा आणि अंतरीचा जिव्हाळा त्यांच्या शब्दाशब्दांतून जाणवतो. याच पुस्तकात यशवंतरावांबद्दल मधू मंगेश कर्णिक यांनी लिहिलेला लेख त्यांच्याबद्दल नेमकी माहिती देणारा आहे. यातील व्यक्तिचित्रे वाचताना यशवंतरावांचा साधेपणा आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अधिकच ठसतो. ग्रामीण भागातील वातावरण, समाजजीवनही यातून छानपणे समोर येते.
गावगाड्यात गेल्या 30-40 वर्षांत आमूलाग्र बदल झाला आहे. या गावगाड्याचा संवेदनशील धांडोळा म्हणजे "अंतर्वेध'. त्यातून वाचकांनाही स्वतःच्या जीवनाविषयी अंतर्मुख होण्याची संधी मिळते.