Summary of the Book
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची अभंगवाणी आणि कबीराचे दोहे हे अनमोल लोकधन आहे. त्यांच्या सुभाषितांची उंची लाभली आहे.
कारण त्यातून त्यांची अंतर्मुख वृत्ती, कठोर आत्मपरीक्ष, डोळस श्रद्धा, अनुभव, सूक्ष्म अवलोकन, परखडपणा, प्रासादिकता आदी वैशिष्ट्ये प्रकटतात. म्हणूनच ती संग्राह्य आहेत. डॉ. कृ. ज्ञा. भिंगारकर यांनी या पुस्तकात बोधवचनांबरोबर त्यांचा अर्थही स्पष्ट केला आहे.
सदाचरण, सत्य-असत्य, लौकिक- पारलौकिक तत्व, क्षमा, शांती, विचार विवेक सद्संगती आदी तत्वांवर ही बोधवचने आहेत. आसपासचा समाज, परिस्थिती, संस्कृती, आदी विषय त्यातून डोकावतात. चांगले जीवन जगण्याची कला ही वचने आपल्याला शिकवतात. या बोधवचनांच्या माध्यमातून संतसाहित्याचाही अभ्यास होतो..