Summary of the Book
या अभिनव ग्रंथाचे लेखक श्री. श्री. पु. गोखले यांना स्वा. सावरकरांचा दोन तपांपेक्षा अधिक सहवास लाभला. अनेक वेळा त्यांना त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचाही योग आला. तात्यारावांची बुद्धी सामाजिक नि राजकीय विचारांत चौफेर वावरणारी. त्यांचे विचारही ज्वलंत, स्फोटक, खळबळजनक, तेजस्वी आणि द्रष्टेपणाचे !
आपल्या प्रदीर्घ सहवासात श्री. गोखले यांनी सावरकरांशी अनेक विषयांवर चर्चा केली, वाद घातला, अनेक खोचक नि वेडेवाकडे प्रश्न विचारले. सावरकरांनीही तितक्याच मनमोकळेपणाने त्यांना उत्तरे दिली.
अशा वेळोवेळी झालेल्या संभाषणांतून सावरकरांनी जे विचार व्यक्त केले, त्यांतील निवडक संवाद श्री. गोखले यांच्या समर्थ लेखणीच्या द्वारे सावरकरांच्याच शैलीत येथे वाचावयास मिळतील.
स्वा. सावरकरांची भेट होणे अत्यंत दुर्मीळ असे. या ग्रंथाने वाचकांना सावरकरांशी सुखसंवाद करण्याचा आणि त्यांच्या सहवासाचा आनंद लाभू शकेल !