Summary of the Book
वन्यजीवांची शिकार करणारे, वृक्षतोड करून जंगल नष्ट करणारे, आपली गुरे जंगलात चरण्याकरिता पाठवून जंगलाला गंभीर हानी पोहोचविणारे यांच्यातल्या दृष्टप्रवृत्ती लयाला जाऊन त्यांच्या मनात वन्यजीवांबद्दल प्रेम निर्माण व्हावे, तसेच 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' ही भावना निर्माण व्हावी,' असे निसर्गअभ्यासक डॉ. व्ही. टी. इंगोले यांनी या पुस्तकाच्या प्रारंभीच नमूद केले आहे. या दृष्टीकोनातूनच त्यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. मात्र, ही त्यांची इच्छा केवळ पुस्तकी नाही.
जंगलाच्या भटकंतीबरोबरच अभ्यास, निरीक्षणे करून त्यांनी जंगल संवर्धनासाठी लेखनातून प्रसार केला आहे. आपल्या पक्षीवेडाविषयी सांगताना त्यांनी डॉ. सलीम आली यांच्या सारख्या अभ्यासकांच्या विचारांचा उल्लेख केला आहे. जंगलात लागणारे वणवे, रानपिंगळ्याचा शोध, आदींची माहिती स्वतंत्र प्रकरणांमधून येते. मेळघाटाचे अवलोकन हे पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्याचबरोबर बस्तरचे अरण्यही थरारक अनुभव देते.