Summary of the Book
समाजाच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी अनेक सत्पुरुषांनी या भूतलावर जन्म घेतला; त्यातीलच श्री स्वामी समर्थ एक होत. जनमानसाला पडलेले प्रश्न, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वामींनी मार्ग दाखवला. ईश्वर आणि माणूस यांच्यातील दुवा होऊन जे जे कार्य समर्थांनी केले त्याचा सखोल अभ्यास म्हणजेच हा ग्रंथ होय. श्री दत्तावतारातील एक महत्वाचा अवतार म्हणून भक्तगणांनी स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रत्ययही अनेकांना आला. अध्यात्म हि अनुभवाची नाही, तर अनुभूतीची गोष्ट आहे हे लक्षात घेऊन जो कोणी समर्थांच्या चरणी लीन झाला तो भवसागर पार झाला. याचेच संशोधनातून पुढे आलेले अनुमान प्रा. यशवंतराव पाटील यांनी या ग्रंथात मांडले आहे. समर्थांच्या जीवनाचा, कार्याचा आणि साहित्याचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी हा ग्रंथ मौलिक मार्गदर्शकाची भूमिका बजावेल.