Hard Copy Price:
25% OFF R 249R 186
/ $
2.38
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 249R
187
/ $
2.40
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर म्हणजेच ‘नारायण धारप’. धारपांनी साहित्यातलं एक नवं दालन वाचकांसाठी खुलं करून दिलं. भीती, गूढता, अतार्किक जग, मनोव्यापार, अशा सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश होता. वाचक यात कसा गुंतला जाईल याची पुरेपूर काळजी नारायण धारप यांनी घेतली होती. नारायण धारप यांनी हे अनाकलनीय वाटणारं जग आपल्या वाचकांना दाखवलं असलं, तरी ते जग दाखवताना अंधश्रद्धेला मुळीच थारा दिला नाही. विज्ञानाची कास त्यांनी सोडली नाही. त्यांनी आपल्या वाचकाला डोळस बनवत प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला लावली. नारायण धारप यांचं आयुष्य, त्यांची प्रेरणा, त्यांच्या निवडक लिखाणाचा आस्वाद, त्यांच्या विज्ञानकथा आणि भयकथा यांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, त्यांचे वाचक त्यांच्याविषयी आणि त्यांच्या लिखाणाविषयी काय म्हणतात, नारायण धारप यांची ग्रंथ संपदा, असं सगळं काही या पुस्तकात वाचायला मिळेल. प्रथितयश लेखिका दीपा देशमुख यांच्या लेखणीतून नारायण धारप आणि त्यांचं लिखाण, हा प्रवास या पुस्तकात अतिशय रंजकपणे उलगडलेला आहे. नारायण धारप यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न.
दीपाताईंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले तर त्यांची तीन नुकतीच प्रकाशित झालेली पुस्तकं हातात घेऊन मला विचारलं...." एक कुठलं देऊ यातलं?"
मी एक निवडलं.....पण त्यांनी एकामागून एक तिन्ही पुस्तकांवर "सप्रेम" लिहिलं आणि सगळी पुस्तकं भेट दिली.
घरी येऊन नारायण धारप उघडलं आणि त्यात माझा फोटो आणि प्रतिक्रिया पाहून एकदम आश्चर्याचा धक्का. दिग्गज लोकांच्या प्रतिक्रियांसोबत माझी प्रतिक्रिया छापून आली होती.दोन उड्या मारुन लगेच पुस्तक वाचायला घेतलं.काही दिवसांपूर्वी धारपाच्या कथांविषयीची प्रतिक्रिया दीपाताईना पाठवली होती.त्यानंतर पूर्णपणे विसरुन गेले होते.आणि एकदम सरप्राईज मिळाले.
लहानपणी ज्या काही लेखकांच्या लिखाणामुळे वाचनाचा नाद लागला त्यातले नारायण धारप एक.रहस्यमय वाचन करताना अक्षरशः सगळं विसरायला व्हायचं.या आवडत्या लेखकाबद्दल आणि त्यांच्या लिखाणाबद्दल जाणून घेणं म्हणजे पुन्हा अनेक आठवणींना उजाळा देणे.
पुस्तक वाचायला घेतल्यावर मुखपृष्ठ बघून मल्हार म्हणे .." काहीही वाचते का? घाबरणार आता तू रात्री आणि भूत येणारे तुझ्या स्वप्नात.... दीपामावशीला सांग भूताचं नको लिहू."