Summary of the Book
प्रमोद कर्नाड यांची प्रेमी दांपत्यांच्या जीवनावरील रसीली ही कादंबरी. दोघांच्या घरातून लग्नाला प्रचंड विरोध, पण दोघं पळून जाऊन लग्न करतात. त्यांची प्रेमकहाणी आणि त्यांचा अत्यंत हुशार मुलगा तन्वीर अशा त्रिकोणी कुटुंबाची ही कथा वाचकाला खिळवून ठेवते. तरुण आणि प्रौढ अशा दोन्ही गटांतील वाचक ही कादंबरी वाचताना आपल्या आयुष्यातील काही प्रसंग त्याच्याशी ताडून पाहतील. कादंबरीत येणाऱ्या प्रेमकविता आणि आयुष्यावर भाष्य करणाऱ्या कविता छान जमलेल्या आहेत. कादंबरीचा फॉर्मही वेगळा आणि वाचकांशी थेट संवाद साधणारा, त्यामुळे वाचक त्या कथानकात नकळतपणे गुंतत जातो.