Summary of the Book
निवृत्त सुभेदार मेजर अशोकराव काशीद यांनी अर्थक्षेत्र हा त्यांचा विषय नसतानाही निवृत्तीनंतर या क्षेत्राचा सखोल अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी गुंतवणुकीबाबत केलेल्या काही प्रयोगांतून त्यांना आलेला अनुभव, तसेच इतरांचे अनुभव, हे सगळे लक्षात घेऊन बचत करताना व योग्य गुंतवणूक करताना काय काळजी घ्यायची याबाबत मार्गदर्शन केले आहे.
आर्थिक नियोजन म्हणजे काय, या मूलभूत संकल्पनेपासून ते गुंतवणुकीच्या खोट्या योजनांपासून कसे सावध राहा, याबाबत अभ्यासपूर्ण अशी 17 प्रकरणे यात आहेत.