Summary of the Book
रा. केशव मेश्राम - सर्वांचे आवडते मेश्रामसर पैलतीरी निघून गेले असले तरी आपल्यासाठी त्यंनी त्यांचे अक्षरांचे आभाळ मागे ठेवले आहे. त्यांच्या अक्षर साहित्याचा आणि त्यांच्या आभाळाएवढ्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न या संपादित पुस्तकात केला आहे. मेश्रामसरांच्या स्नेही-सुहृदांनी आणि मान्यवर समीक्षकांनी त्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. दलित म्हणून जन्माला आलेले मेश्राम आपल्या प्रतिभेच्या आणि अखंड परिश्रामाच्या बळावर मराठी साहित्य विश्वातले एक दिग्गज साहित्यिक ठरले. कविता, कथा, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा, वैचारिक लेखन अशा सर्वच क्षेत्रात त्यांची लेखणी सतत लिहीती राहिली. अनेक विध्यार्थ्यांना त्यांनी मराठी साहित्याची गोडी लावली. कोणतेही पाठबळ, कोणतीही अनुकूलता नसताना एक लेखक म्हणून, प्राध्यापक म्हणून आणि सहृदय माणूस म्हणून स्वतःला घडवत असताना मेश्रामसरांना प्रचंड संघर्ष, धडपड करावी लागली. विशेषतः प्रस्थापितांच्या कंपूत सामील न होता आणि दलितत्वाचा न्यूनगंड किंवा वृथा अभिनिवेश अंगी न बाळगता साहित्यीक म्हणून आपला एक स्वतंत्र, वैशिष्ट्यपूर्णा ठसा उनटवणां ही सोपी गोष्ट नव्हती. मेश्रामसरांनी ती लीलया साधली. आश्चर्य म्हणाजे त्याचा थोडाही अहंकार त्यांच्या मनात नव्हता. म्हणूनच त्यांच्या साहित्यात समन्वयाची प्रगल्भ भूमिका ते मांडतात. अन्याय्य व्यवस्थांशी, नीतिनियमांशी, रुढी-परंपरांशी झागडणार्या या मनस्वी माणसाला अनेक वेळा उदासीनतेने, एकटेपणाने विकल केले, पण शब्दांचा, विद्रोही साहित्य चळावळीचा आधार घेत त्यांनी पुन्हा उभारी धरली. अनेक मानसन्मान मिळवले. हे पुस्तक त्यांना आदरांजली ठरेल!