Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
4.29
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
भारत आणि पाकिस्तान एकाच राष्ट्राचे दोन तुकडे. सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक साम्यस्थळे असली; तरी गेल्या ५० वर्षांच्या काळात हल्ला-प्रतिहल्ला, कुरापती, संशय, गैरसमज व द्वेष यामुळे या देशांचा इतिहास सर्वश्रुत आहे. लष्करशाही व लोकशाहीमुळे पाकिस्तानमध्ये निर्माण होणाऱ्या अस्थिर परिस्थितीचे भूत भारताच्या मानगुटीवर कायम बसलेले आहे. दहशतवादी कारवाईने भारतात १९८९ च्या काळात जोर धरला. तेव्हापासून पाकिस्तानमधील संबंधात अधिक कटुता आली. १९९९ मध्ये दोन्ही देशांमध्ये सामंजस्य चर्चा सुरु झाली. मात्र कारगील युद्ध, भारतीय विमानाचे काठमांडू येथून अपहरण. संसदेवरील हल्ला या घटनांनी पाकिस्तानची बाजू उघड झाली. शांतता आणि युद्ध काळात या देशांमधील ताणतणाव, संबंध कसे होते, त्यात कसे बदल होत गेले, याचे चिंतन जे. एन. दीक्षित यांनी 'युद्ध आणि शांतता काळात भारत-पाकिस्तान यामध्ये केले आहे. १९५८ पासून या देशांचे संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग होता. १९८९ ते १९९१ या काळात ते भारताचे पाकिस्तानमधील राजदूत व उच्चायुक्त होते. पाकिस्तानविषयीच्या प्रदीर्घ अनुभवातून हे पुस्तक सिद्ध झाले आहे. याचा मराठी अनुवाद सुवर्ण बेडेकर यांनी केला आहे.