Summary of the Book
हजारो वर्षापूर्वी एक महासंग्राम झाला होता. त्या महासंग्रामाची तुलना अलीकडच्या काळातील कोणत्याही युद्धाची त्या संग्रामाशी तुलना होऊ शकत नाही. अर्थात महाभारतातील या युद्धाकडे आजही विश्लेषक आणि चिकित्सक दृष्टीने पाहिले जाते. लेखक संजय ना. गुन्हाने यांनी या पुस्तकात कौरव व पांडव यांच्यात झालेल्या महासंग्रामाचा वेध घेतला आहे. उद्योगपर्वापासून कथेला सुरवात होते.
युद्धाचा निर्णय, युद्धाची तयारी, युद्धाचा पहिला दिवस अशा तऱ्हेने युद्धाची दैनंदिनी वाचायला मिळते. मुळात युद्धाची सारी कथा रोमांचक आहे. त्यामुळे युद्धातील महत्त्वाचे प्रसंग, व्युहरचना, सातत्याने बदलणारी परिस्थिती, व्यक्तिरेखांमधील ताणतणाव आदींसंबंधात वाचणे उत्कंठावर्धक आहे. सर्व पांडवांच्या महाप्रयाणापर्यंतचा भाग पुस्तकात आला आहे.