Summary of the Book
शोभना भालेराव यांच्या या कवितासंग्रहात ग्रामीण जीवन आणि पर्यावरण यांचे चित्र उमटले आहे. आपल्या कवितांतून भालेराव यांनी समाजातील विविध घटकांशी संवाद साधला आहे. त्याचबरोबर दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची वेदना त्यांच्या कवितांतून समोर येते. विठ्ठलभक्तीची एक सुंदर कविता यात आहे; पण सर्वच कविता अध्यात्माशी संबंधित नाहीत.