Summary of the Book
हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. मात्र, स्वराज्याच्या निर्मितीमागची मूळ संकल्पना जिजाऊ आणि शहाजीराजांची होती.
शहाजीराजांनी स्वतः चार वेळा तसे प्रयत्नही केले, असे लेखक राजेंद्र घाडगे यांनी या चरित्रातून प्रकाशात आणले. स्वतंत्र राज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊ आणि शिवाजीराजे यांना त्यांनी प्रेरणा दिली.
कर्नाटकात राहून त्यांनी तेथेही त्यांचे स्वतंत्र राज्य स्थापले. मराठी, कन्नड आणि तेलुगू भाषकांच्या मनात त्यांनी राष्ट्रीय ऐक्य व सामाजिक सलोखा निर्माण केला. लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन केले.
हे सर्व गाडगे यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे. या लेखनासाठी त्यांनी अनेक इतिहासकार आणि बखरकारांनी मांडलेल्या असंख्य ऐतिहासिक घटनांचा शोध घेतला आहे.