Summary of the Book
आजच्या सामान्य माणसाचं एकमेकांपासून तुटलेलं आयुष्य , हरवलेला संवाद , माणूसपणच नाकारलं जाणं , मनाला आलेलं निबरपण , त्याच्या वेदना , आभासी मैत्रीचं वैयर्थ्य आणि त्यातून येणारी घुसमट ... अस्तित्वाचा लोप पावण्याच भय , त्यामुळे होणारे आत्मक्लेश ... हे या कवितेचं जीवद्रव्य आहे
.... एकीकडे स्वतंत्र काव्यधारा म्हणावं , तर दुसरीकडे एकेक कविता कोणा दिग्गजांची आठवण करून देते . एकही वेळा ती इतकी स्वतंत्र होते की , कधी कधी आकलन अवघड होते ...
... अर्थाची अनेकानेक वलय उमटवत राहण हे प्रतिभेचं काम असत , आणि ते इथे दिसून येत....