Summary of the Book
संस्कृती, प्रेमळ, एकदिलाने राहणे हे गावाचे वैशिष्ट्य; पण गेल्या काही वर्षांमध्ये खेडी बदलली आहेत. साखर कारखाने, बागायती क्षेत्र यामुळे गावकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळायला लागला आणि गावकऱ्यांची जगण्याची भाषाच बदलली. याला राजकारण्यांनी खतपाणी घातले. लोकसंस्कृतीच्या जागी लाभसंस्कृती आली. इनाम, निष्ठा गायब होऊन लाळघोटेपणा, दांभिकता सुरु झाली. अप्रामाणिकपणा, खोटारडेपणा वाढला. शहरी संस्कृतीची चटक लागली. त्यातून अनेक अनिष्ट पध्दती आल्या आणि गावाचे गावपण सरले. गावाच्या अशा अधोगतीने व्यथित होऊन प्रा. व. बा. बोधे यांनी त्यांची खंत, अस्वस्थपणा 'कृष्णविवर'मधून व्यक्त केला आहे. देशाच्या पाया असलेल्या ग्रामसंस्कृतीचा होत असलेला ऱ्हास पाहून संवेदनशीलता बधीर होते.